रसगुल्ले
भारी ,भारीच गडे ,
गोल धवल रुपडे ।
तरंग सभोवती ,शर्करेचे कडे,
मधुर कसे, दुग्धाभ्र वडे ।
अन्नपूर्णेची जादू की गडे,
चाखण्याआधी रसना तडफडे।
नसे कोणा खाण्याचे वावडे ,
वाटते रस होऊनि गुल व्हावे ।
रसल्ले होऊन रसनेवर विरावे ,
परिसहात जपत स्मरत विहरावे।
साखर आरोळी मारत धावावे,
या मुखातून त्या मुखास तृप्तावे।
होऊन रसगुल्ले ,रसगुल्ले नमावे ।।
बासुंदी
छान आहे तुकबंदी ,
मस्त झाली पाक बासुंदी ।
काकांची का घ्यावी दीक्षा ,
वैशाली स्वयं सिद्ध लक्ष्या ।।
अन्नपूर्णेचे हात हजार,
कणाकणामध्ये भरली चव अपार।
© काकासाहेब वाळुंजकर
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
किती हे छान काम,
पहिला आला गुलाबजाम।
मग झाली घाई जयश्री,
ताईची आली रसमलाई।
गोड जिभेला चटका दयायला,
आला सोया चंक्स मसाला।
रसिकाची मग वाढली सीमा ,
सानिका ने पाठवला चपाती खिमा।
ह्या सर्वाना वा,वा देत ,
मग आला जेवणाचा साधा बेत।
वैभव भाऊचा प्रश्न सोडला,
संजय भाऊचा आत्मा तृप्त झाला।
अन आजचे पदार्थांची वा,वा करता करता ,
अन्नपूर्णा गटावरील सगळयांचा रसिका ज्वाला शांत झाला।
©वैशाली वेटाळे
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment